नमस्कार…
हल्ली असा एकही दिवस जात नाहीय ज्यादिवशी नागपुरात खू’न , ह’त्या , दरो’डा सारखी एखादी मोठी घटना घडत नसेल. वैयक्तिक भांडणातून होणारे गु’न्हे वेगळे पण सामुहिकपणे केल्या जाणाऱ्या गु’न्ह्यांमुळे पुन्हा एकदा नागपूरमधील पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
त्याचाच प्रत्यय आज पुन्हा आला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दहा पंधरा जणांच्या एका समूहाने भररस्त्यात द’हश’तीचा नं’गाना’च केला. हातात लाठ्याकाठ्या घेऊन लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण केली. विशेष म्हणजे हा युवकांचा ग्रुप एकाची ह’त्या करायला निघाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
काय घडलं रात्री नेमकं 8 वाजता? :- नागपूर शहरातील गु’न्हेगा’र पो’लिसांना जुमानत नासल्याच पुन्हा एकदा उघड झाल आहे, शांती नगर परिसरात रात्री 8 च्या सुमारास 10 ते 15 युवक हातात लाठ्याकाठ्या तलवारी घेऊन त्या परिसरात द’हश’त मा’जवत असल्याची दृश्य CCTV मध्ये कैद झाली आहेत.
शांतीनगर परिसरातील दहीबाजार, भीम चौक इत्यादी
परिसरातून हे युवक भरधाव वेगाने दुचाकीवरुन फिरून द’हशत करत असल्याचे cctv मध्ये दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील पाचपावली परिसरात कोणाच्या तरी ह’त्येचा प्लॅन या टोळीने केला होता, मात्र वाटेत पो’लीस दिसल्याने टोळी सैरभैर झाली.
पोलिसांना या टोळीची माहिती मिळताच ते सतर्क होऊन ऍक्शन मोडवर आले. शहरात सांचारबंदीचे नियम लागू
असल्याने संध्याकाळच्या वेळी चौकाचौकात पोलीस तैनात असताना 10 ते 15 युवक शस्त्रासह एकत्रित येऊन
दीड तास दहशत पसरवतात आणि पोलिसांना याचा सुगावा देखील लागत नाही यावरून पो’लिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मात्र या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी यांचा शोध घेत १३ आ’रोपीना अ’टक केली. त्यांच्याकडे असणारी श’स्त्र जप्त केली आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिक सध्या द’हशतीत असून भीतीच वातावरण परिसरात आहे.
बघा विडिओ
News Source :- TV9 Maharashtra