दमा (अस्थम्याच्या) समस्येपासून वाचण्यासाठी घ्या या गोष्टींची काळजी.

सध्या वाढत्या प्रदूषणामुळे दम्याचे गंभीर आजार मुलांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांमध्ये आढळू लागले आहेत. दम्याचा अटॅक कधीकधी इतका खोल असतो की

त्यावेळेस रुग्णाला वाचवण्यासाठी नक्की काय करावे याबद्दल काहीही माहिती नसते. म्हणूनच ज्या व्यक्तींना दम्याची गंभीर समस्या आहे. त्यांनी काही खाद्यपदार्थ खाणे टाळावे.

दम्याच्या रुग्णाला दूध आणि त्यापासून बनवलेल्या गोष्टी खाणे टाळल्या पाहिजेत. या वस्तूंच्या सेवनाने खोकला, शिंक आणि कफ इत्यादींच्या समस्या खूप जास्त होतात.

जे लोक या गोष्टींचे नियमित किंवा जास्त प्रमाणात सेवन करतात. त्यांच्या दम्याच्या समस्या खूप जास्त प्रमाणात वाढत आहेत.

तसेच दम्याच्या रूग्णांनी, विशेषत: जंक फूडपासून दूर रहावे. तसे न केल्यास तुमच्या दम्याच्या समस्या पुन्हा पुन्हा वाढू शकतात .

दूध आणि फास्ट फूड व्यतिरिक्त दम्याच्या रूग्णाला अंडी, लिंबूवर्गीय फळे, गहू, सोया इत्यादी पदार्थ व या पदार्थांपासून बनवलेल्या गोष्टींपासून दूर रहावे.

दम्याच्या रूग्णाने डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्याच्या आहाराची योजना आखली पाहिजे. जेणेकरून त्याला वारंवार दम्याचा अटॅक येत नाही आणि दम्याचा त्रास जास्त होणे रोखू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *