। नमस्कार ।
सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच हवामान खात्याने पुन्हा 3 , 4 दिवसांनी पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता दर्शवली आहे. या मागील 4 ,5 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील जिल्हा रायगडमधील महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळली होती.
या घडलेल्या दुर्घटनेतून एका हिरकणीने चक्क आपल्या तीन मुलांचा जीव मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढला आहे. या हिरकणीचे नाव शेवंता नंदू कोंडाळकर आहे. या दुर्दैवी घटनेची ती प्रत्यक्ष साक्षीदार आहे. या डोंगराचा भाग म्हणजेच ती कोसळलेली दरड त्या गावातील अनेक कुटुंबियांसाठी त्यांचा काळ बनून आली होती. परंतु यातून मोठ्या हिमतीने या आईने आपला जीव वाचवत तिने आपल्या तीन मुलांनाही तिने अक्षरश: मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढले आहे.
मन सुन्न करून टाकणाऱ्या या दरड कोसळलेल्या दुर्घटनेतून एकदा नव्हे तर चार वेळा तिच्या मुलांवर दरडीचा काही भाग येता येता वाचला होता. परंतु त्या माऊलीने आपल्या जीवाची परवा न करता तिने चक्क आपल्या दोन मुली आणि एक मुलगा असे तिघांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
काही समजायच्या आतच अचानक डोंगर खचला आणि क्षणार्धात हा डोंगर पूर्णपणे वाडीतील घरांवर कोसळला. जो-तो आपापला जीव वाचवण्यासाठी सैरभैर धावत होता. परंतु तो काळ खूप भयानक होता आणि त्या गावाच्या मागेच लागला. आणि तेथील चिखल, माती, दगड बरोबर सर्वकाही वाहून गेले.
आपल्या मुलांचा हात हातातून सुटू नये म्हणून शेवंता नावाच्या या माऊलीने आपल्या मुलांचे कपडे पकडून ओढत खेचले आणि दलदलीतून बाहेर काढले. परंतु त्या चिमुकल्या मुलांना त्यांच्या डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता. कारण त्यांचे मित्र आजूबाजूचे नातेवाईक सगळेच लोक या दलदलीत फसले होते. ते सुद्धा जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होते. परंतु त्यांच्या मदतीला धावून जाण्यास कोणीही जात नव्हते कारण ती वेळच तशी होती.
निसर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात को’पला होता आणि त्यावेळी निसर्गापुढे माणूस हतबल झाला होता परंतु त्याही प्रसंगातुन आपल्या जीवाची पर्वा न करता त्या माऊलीने आपल्या तीनही मुलांचा जीव वाचवला पाहिजे , हे तीच कर्तव्य तिने बजावत या हिमतीने शेवंता कोंडाळकर यांनी आपल्या तीन मुलांचा जीव वाचवला.
अक्षरश: कंबरभर चिखलातून तिने वाट काढत काढत ती पुढे चालत राहिली, चारच्या सुमारास डोंगराचा काही भाग कोसळला ही संपूर्ण घटना तिच्या डोळ्यासमोर दिसत होती. काहीजण वाचवण्यासाठी दया याचना करत होते, परंतु त्यांना वाचवणे शक्य झाले नाही ही खंत आपल्या मनात असल्याचं त्या माउलीने बोलून दाखवल आहे.
मी माझ्या मुलांना दिलेला शब्द पाळला परंतु इतर आमचे नातेवाईक सहकारी या दुर्दैवी घटनेत आपल्या डोळ्यासमोर गतप्राण झाल्याचे शल्य त्यांच्या मनामध्ये कायम आहे. त्यांनी काजल कोंढाळकर, अक्षता कोंढाळकर आणि परम कोंढाळकर या तिन्ही मुलांचे प्राण वाचवले.