भारतीय संस्कृतीत घरातील स्त्री ही देवी लक्ष्मीचे रूप मानली जाते. अशा परिस्थितीत घरात तिच्या शुभ कर्मांनी आणि वैशिष्ट्यांमुळे सुख आणि समृद्धी कायमच मिळते.
म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याला लक्ष्मी म्हणजेच सून व घरातील मुलगी यांना विशेष महत्त्व दिले जाते. पण या बरोबरच घरातील लक्ष्मीच्या योग्य आणि अयोग्य कृतीमुळेही आनंद आणि घराचे भाग्य उजळते.
म्हणूनच घरावर आई लक्ष्मीची दयादृष्टी राहण्यासाठी घराची लक्ष्मी काही वाईट किंवा अशुभ कर्मांपासून वाचली जाणे आवश्यक आहे.
कारण विश्वासानुसार जर घरातील स्त्रिया असे काही काम करत असेल तर, मग त्या घरातून देवी लक्ष्मीचा वास कमी होऊ होऊ शकतो.
घरात स्वच्छता न ठेवणे :-
आपल्या सर्वांना हे माहित आहे की देवी लक्ष्मीला स्वच्छतेची आवड असते आणि जेथे योग्य स्वच्छता नसते तेथे लक्ष्मी कधीही राहत नाही.
परंतु आजच्या आधुनिक युगातील स्त्रिया घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत नाहीत. आजच्या काळात महिला वैयक्तिक शोभा वाढवण्याकडे खूप लक्ष देतात.
पण घरातील स्वच्छतेबद्दल त्यांना काही वाटत नाही. या सवयीमुळे जिथे घरात अस्वछता आहे, तेथे देवी लक्ष्मी तुमच्यावर संतापल्या असू शकतात.
म्हणूनच, आई लक्ष्मीचे आशीर्वाद घरावर नेहमीच रहावेत अशी तुमची इच्छा असल्यास, घराच्या स्वच्छतेकडेही आपण योग्य लक्ष दिले पाहिजे.
झाडूचा अपमान करु नका :-
धार्मिक श्रद्धेनुसार झाडू देखील लक्ष्मीचे रूप मानली जाते. तसेच देवीला आवडत असलेली स्वच्छता यासाठी हिचीच तर मदत लागते. अशा परिस्थितीत घरातील स्त्रियांनीही झाडूचा योग्य प्रकारे आदर केला पाहिजे.
कधीकधी लोक घरात पडलेली झाडू पायाने तुडवतात… पण त्या लोकांना सांगावेसे वाटते की, झाडूला पाय लावू नये. तसेच, लोकांच्या नजरेपासून झाडू नेहमी संरक्षित ठेवून ठेवायला पाहिजे.
घरी आलेल्या अतिथीचा अपमान करु नका :-
पाहुणेलासुद्धा देवाची प्रतिमा मानली जाते. अशा परिस्थितीत घरातल्या आलेल्या पाहुण्याला घरातील स्त्रियांनी किंवा घरातल्या कोणत्याही सदस्याने कधीही विसरू नये आणि त्याचा अपमान करु नये. असे केल्यास देवाच्या कृपेने घरातील सुख आणि समृद्धी कायम राहील.
घराच्या दाराला धक्का मारू नका :-
कधीही घराचा दरवाजा धक्का मारून किंवा लातेने उघडू नका कारण असे मानले जाते की देवी लक्ष्मी घराचा दरवाजा अडखळल्यामुळे रागावतात.
तसेच आपल्या घराची सुरक्षितता ही घराच्या दरवाज्यावरच अवलंबून असते. म्हणून कधीही घराच्या दरवाजाचा अपमान करू नका.
घराच्या उंबरठ्यावर बसू नका :-
गृहलक्ष्मीने किंवा कोणीही कधीही घराच्या उंबरठ्यावर बसू नये आणि इथे बसून जेवणही करू नये. कारण शास्त्रात घरातील उंबरठ्याला एक विशिष्ट स्थान देण्यात आले आहे. असे मानले जाते की देवी लक्ष्मी घरात प्रवेश करताना येथूनच येते. म्हणून या ठिकाणी बसणे योग्य मानले जात नाही.
रात्री उष्टी भांडी ठेवू नका :-
धार्मिक विश्वासांनीही घराच्या स्वयंपाकघरांना विशेष महत्त्व दिले आहे. असे मानले जाते की स्वयंपाकघर स्वच्छ ठेवल्याने देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न राहतात.
पण हल्ली काही लोक रात्री उष्टी भांडी तशीच ठेवतात ज्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर क्रोधीत होऊ शकतात. घर स्वच्छ व समृद्ध ठेवण्यासाठी रात्री भांडी स्वच्छ करून स्वयंपाकघर स्वच्छ करणे आवश्यक आहे.
अन्न शिजवल्यानंतर चूल किंवा गॅसवरून भांडे बाजूला ठेवा :-
स्वयंपाकघरात अन्न शिजवताना, घरातील स्त्रियांनी स्वयंपाक केल्यानंतर स्टोव्हवरून पॅन किंवा इतर भांडी काढून ठेवायची काळजी देखील घेतली पाहिजे, कारण स्टोव्हवर अनावश्यक किंवा रिक्त भांडी ठेवणे चांगले मानले जात नाही.